द्रमुक ईडीला घाबरत नाही; खटल्यांना सामोरे जाणार : उदयनिधी   

चेन्नई : द्रमुक अंमलबजावणी संचालनालय किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  कारवायांना घाबरत नाही. जनतेच्या हक्कांसाठी पक्ष आवाज उठवत राहील आणि कायदेशीररित्या खटल्यांना सामोरे जाईल, असे द्रमुक युवा शाखेचे सचिव उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 
 
टीएसएमसी या सरकारी मालकीच्या उद्योगाच्या कार्यालयांवर ईडीच्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला स्टॅलिन उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षांना उत्तर देताना ते म्हणाले, द्रमुक सरकार कोणत्याही धमकीने दबले जाणार नाही. आम्हाला ईडी किंवा मोदींची भीती वाटत नाही. कलैग्नार यांनी वाढवलेला द्रमुक हा स्वाभिमान असलेला पक्ष आहे. तो बुद्धिवादी नेते ई. व्ही. रामास्वामी यांच्या तत्वांशी दृढपणे जोडलेला आहे.केंद्रातील भाजप सरकारने आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला होता; पण आम्ही हार मानली नाही. आमचा पक्ष गुलामगिरीची मानसिकता असलेला पक्ष नाही. आम्ही खटल्यांना कायदेशीररित्या सामोरे जाऊ.

Related Articles